Monday, August 20, 2018

गरुडझेप

गरुडझेप

           आई-वडील दोघेही सर्व सामान्य. रा. बलवडी मुलगाही शाळेत अत्यंत हुशार म्हणून लगेच कोणत्याही इंग्रजी शाळेत त्याला न घालता त्यांनी विश्वास टाकला तो नाझऱ्यामधील श्रीधर कन्या प्रशालेवर, यामुळे शाळेसाठी दररोज करावा लागणारा सात किलोमीटरचा प्रवास कधी सायकल तर कधी वडिलांबरोबर. सकाळी शाळेला आले की अभ्यास पूर्ण करूनच रात्री घरी परतायचे असा त्याचा दिनक्रम. मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा येण्याचा मान मिळवला. जयदीप नेताजी शिंदे असे या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव आहे. जयदीपने ३०० पैकी २६४ गुण मिळविले. 
           शिष्यवृत्ती परीक्षेत हमखास यश आणि सांगोला तालुक्यातील नाझरे या अत्यंत ग्रामीण भागातील श्रीधर कन्या प्रशाला शाळा हे समीकरण अलीकडे घट्ट झाले आहे. फक्त जयदीपच नव्हे तर याच शाळेची विद्यार्थिनी कु. प्रेरणा संभाजी पवार हिनेही इ पाचवी मधून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा येण्याचा मान मिळवला. प्रेरणाने भाषा व गणित  विषयांत १४० गुण व इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयांत १२८ गुण असे एकूण २६८ गुण मिळवले या शाळेचे तब्बल 11 विध्यार्थी राज्य शासनाच्या गुणवत्ता यादीत आले आहेत तसेच  यापूर्वी अनेक  विद्यार्थी  शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. याच शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी फक्त शिष्यवृत्तीच नव्हे तर महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्वच
परीक्षेत यापूर्वीदेखील घवघवीत यश प्राप्त केले आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश परिचारक यांचे नियोजन, सर्वच शिक्षकांची जिद्द आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे हे शक्‍य झाले आहे.

          जयदिपचे घर शाळेपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. शाळेत सकाळी सात वाजता तो आपल्या वडिलांबरोबर येतो तर कधी स्वतः सायकलवर.  दोन तास शाळेत शिष्यवृत्तीचे जादा तास मार्गदर्शक शिक्षक घेतात. येताना आणलेला डबा दहा वाजता खाऊन पुन्हा ११ ते ५ पर्यंत नियमित अभ्यासक्रम शिकवला जातो. विशेष म्हणजे या शाळेत येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे याचे कारण सेवाभावी वृत्तीने शिक्षक हे काम करतात.

           जयदीपने भाषा व गणित विषयांत १३२ गुण व इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयांत  १३२ गुण मिळवले आहेत. पहिलीपासून तो विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवत आहे. त्याच्या मेहनतीच्या बळावर आणि श्रीधर कन्या प्रशालेत शिकवल्या जाणाऱ्या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच त्याला यश मिळाले आहे. या शाळेने आजवर असंख्य गुणवंत विद्यार्थी बनवले आहेत. श्रीधर कन्या प्रशाला ही मराठी व सेमी माध्यमाची शाळा प्रत्येक शैक्षणिक बाबीत नेहमीच अग्रेसर असते त्यामध्ये या परिक्षांबरोबरच कला क्षेत्रातील एलमेंटरी व इंटरमेडीएट परिक्षात आजपर्यंत 100% निकालाची परंपरा आहे तसेच दहावी व बारावी बोर्डाचा निकाल व NMMS परीक्षा, मंथन परीक्षा निकालात नेहमीच अग्रेसर  असणाऱ्या या शाळेचे 2 विद्यार्थी आज राज्यपातळीवर झळकले याचा सार्थ अभिमान संस्था अध्यक्षा रुद्रम्मादेवी पाटील, उपाध्यक्षा यमुना पाटील,  सहसचिव मुकुंदराव पाटील, प्रशालेचे प्राचार्य प्रकाश परिचारक  सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांना सार्थ अभिमान आहे तसेच कै वसंतराव पाटील यांनी ज्या उद्देशाने शाळेची स्थापना केली तो उद्देश आज साध्य झाल्याने त्यांनाही आज प्रशालेकडून या उज्वल यशाच्या माध्यमातून आदरांजली मिळाली तसेच कोणत्याही शाळेच्या वरवरच्या रुपाकडे न पाहता अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच यश मिळते असा गैरसमज न बाळगता श्रीधर कन्या प्रशाला सारख्या शाळेत येऊन प्रत्यक्ष गुणवत्ता पाहून आपल्या पाल्यांना प्रवेश घेतल्यास त्यांचे भविष्य उज्वल असेल याची खात्री वरील या 2 विद्यार्थ्यांच्या उदारहारांवरून देता येते. 
            लेखाच्या शेवटी प्रशाला व गुणवंत जयदीप व प्रेरणा यांच्या बद्दल एकच वाक्य लिहावंसं वाटत की तुम्ही  
कष्ट इतकं शांततेत केलं की आज तुमच्या यशाचा आवाज संपूर्ण राज्यात पोहचला. अभिनंदन.
शब्दांकन:- श्री विकास राऊत

No comments:

Post a Comment

छत्रपती शिवाजी महाराज

                    नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो धर्मभूमी जिच्या कामी, पडो देह माझा सदा ती नमामी ।। परमप...